गेले कित्येक वर्षे सेना, काँग्रेस आणि आता मनसे, मुंबईतील अमराठी (म्हणजेच उत्तर भारतीय व ईतर) लोकांवर मराठी भाषेच बंधन टाकण्याच प्रयत्न करताहेत, का हा प्रश्न ह्या पोष्ट्च्या कॅटेगरीत मोडत नसल्याने मी टाळत आहे.
दुकानांची बोर्ड मराठीत रंगवली जात आहेत, सरकारी कार्यालयात मराठी बंधनकारक केल जात आहे, घोशना, जाहीराती, प्रचार ई.. सर्वच मराठीत.
ह्या सर्वांचा अमराठी भारतीयांवर कीती परीणाम झाला आहे, ह्यावर माहीती उपलब्द नाही. पण वाढत चाललेल्या अमराठी संख्येचा मराठी भाषेवर कसा परीणाम होतोय हे आपल्याला रोज बस स्टॉपवर, ट्रेनमध्ये, बाजारात, ऑफिसात तर कधि कधि घरीसुध्दा ऐकायला मिळेल.
अशा काहि ओळि मी स्वत: ऍकलेल्या व बराचश्या ईंटरनेट सापडलेल्या.

१. केस एकदम बारीक कापो भय्या.
२. अरे डोके को ईतना तेल क्यो लगाते हो. लगाते हो तो लगाते हो, उपर से भरी हुई ट्रेनमे चढते हो.
३. ये क्या ड्रींक बनाया है, बराबरसे ढवळके लावो.
४. सरबत मे लिंबु पिळा क्या.
५. ओ साहब, गाडी सावली मे पार्क करो.
६. अरे भैय्या इतना भाव कायको खाता है.
७. ए भाय मेंदुवडा सेपरेट लाना, सांबार मे बुडाके मत लाना.
८. अरे अपना हि घर समझो, लाजो मत, पोटभर खावो.

आहे की नाहि मज्जा .. आता ह्यात तुम्हि एकलेलि बम्बईया मराठी टा़का.
2 Comments   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links