समकालीन काळात महाराष्ट्रातील कर्तबगार प्रतिभावंत मराठी व्यक्तिमत्त्वांमधे डॉ.अच्युत गोडबोले यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते.मुंबई IIT तुन केमिकल इंजिनीरिंगचे शिक्षण घेतलेल्या अच्युत गोडबोलेंची जगात एक सॉफ्ट्वेअर डेव्हलपर म्हणुन ख्याती आहे.
या क्षेत्रात ते मागील ३० वर्षापासून कार्यरत आहेत.अनेक विषयांमध्ये त्यानी मुशाफिरी केली असून संगीत,अर्थशात्र,विज्ञान,मानसशात्र, आणि साहित्य या शेत्रामध्ये त्यांनी ६ दर्जेदार पुसाताकांचे लेखन केले आहे.अमेरिकेच्या IBM WORLD TRADE CORPORATION दोन वेळा सर्वोत्तम कामगिरीसाठी पुरस्काराने सानमानीत केले आहे.
त्यांची माहिती तंत्राज्ञान विषयीची तीन पुस्तके संपूर्ण जगभरातील विद्याथी संदभासाठी वापरत असतात.त्यांनी आतापर्यंत पटकावलेल्या अनेक पुरस्कार आणि संमानांमध्ये IIT चे प्रभावी माजी विद्याथी पुरस्कार,भारतीय आर्थिक परिषदेचे उद्योगारथ.तसेच संगीत व संगणकातील योगदानासाठी पंडित जोशी यांच्या तर्फे कुमार गंधर्व पुरस्कार यांचा समावेश आहे.त्यांनी मतीमंद मुलांसाठी एक शाळा सुरु करण्याकरिता लक्षणीय मदत केली आहे.
लोकमत मेडिया द्वारा २०११ सालावर प्रभाव टाकलेल्या आठ मराठी व्यक्ती निवडण्यासाठी स्थापित ,'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ स एअर अवार्ड २०११' पुरासाकाराचे विजेते निवडण्याच्या जुरी मंडळावर डॉक्टर .अच्युत गोडबोले यांना स्थान देण्यात आले आहे.२१ डिसेंबर रोजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन या ८ विजेत्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
डॉक्टर.अच्युत गोडबोले यांनी महाराष्ट्रातील एकंदर घडामोडींवर व्यक्त केलेले विचार पुढील प्रमाणे आहेत:
लोकमत समूहातर्फे स्थापित 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ स एअर अवार्ड २०११'पुरासाकाराचे विजेते निवडण्यारा जुरी पानेल वर आपण स्वतंत्र जुरी आहात.या पुर्साकाराची भुमिका आणि योगदान की असेल?
महाराष्ट्र राज्याच्या विविध क्षेत्रातील प्रगती आणि विकास कार्यात आदर्शवत योगदान दिलेल्या अतुलनीय व्यक्तींची नोंद घेऊन त्यांचा आदर करण्यासाठी या पुरस्काराची स्थापना करण्यात आली आहे.आजघडीस अशा उपक्रमाची खूप गरज असल्याचे मला मनापासून वाटते.पुरस्कारांची निवड प्रकिया तर अत्यंत न्याय ,खुली अ पारदर्शक आहे.इतरांसाठी हे पुरस्कार एक आदर्श व अनुकरणीय ठरणार आहेत.
प्रत्यक्ष देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील हे पुरस्कार स्वता प्रदान करण्यासाठी
मुंबईस उड्डाण करीत आहेत या विषयी आपण की म्हणाल?
विजेत्यांना पुरस्कुत करण्यासाठी त्या स्वतः जातीने उपस्थित राहणार आहेत हि खरच खूप मोठी बाब आहे.हा एक उत्तम संकेत आहे.राष्ट्रपतीच्या उपस्थितीमुले पुरस्काराची प्रतिष्ठा आणि विशासानियाता यात अर्थातच वाढ होणार आहे.
विविध नामानिद्रशानांपैकी आपल्या लक्षात राहिलेली एखादे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व सांगू शकाल काय?
मुंबईचे डॉक्टर.बावसकर यांनी विन्चुदान्शावर आराम देणारे जे आद्यासंशोधन केले आहे त्याने मी खूपच प्रभावित झालो आहे.तसेच इतर राज्यातून येऊन येथील गोरगरिबांच्या कल्याणासाठी वाहून घेतलेल्यांचे दायित्व पाहून मी हेलावून गेलो आहे.
मला वाटते,अशा प्रकारच्या उपक्रमांना पाठींबा देण्यासती सर्व प्रमुख प्रसारमाध्यमे ,सेलेब्रिटी आणि बधीवाद्यानी एकत्र आले पाहिजे.यामुळे पुरस्काराच्या विशाव्नियातेत वाढ होईलच त्या बरोबर सहभागींच्या आताम्विशावासात देखील प्रचंड वाढ होईल.
महाराष्ट्राची जनता आणि पुरस्कारासाठीचे अंतिम ३९ विजेते यांचेसाठी आपण की संदेश द्याल?
महाराष्ट्रातील जनतेसाठी खरे तर प्र्यातेक मराठीजनासाठी मी सांगेल, उद्यमशील व्हा.बदल स्वीकारून नाविन्ण्याची कस धारा,आणि मानवी मूल्यांचे जतन करा.
लोकमत प्रभावी मराठी व्यक्ती निवडीसाठीच्या अंतिम याडीतील व्यक्तींचे त्यांनी राज्याच्या प्रगतीसाठी केलेल्या महान कार्यासाठी मी त्यांचे आभारी मानेन. म्हणेन, तुम्ही आम्हांला अभिमान वाटावा असेच कार्य केले आहे. असेच पुढे जा. तुम्हांला माझ्या सुभेच्छा!
आपल्याकडून आणखी काही विशेष संदेश?
यंदाचे वर्ष पुरस्काराचे दुसरे वर्ष असून सर्वत्र बदल घडविण्यास हा पुरस्कार भरीव मदत करीत आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण आणि आरोग्य आणि संगीत अशा विविध क्षेत्रांतील खास गटांसाठी देखील या पुरस्कारांचा विस्तार होईल असे मला वाटत आहे.
Discuss Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments