दहावीच्या परीक्षेत राज्यभरात पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली असली तरी राज्यात सर्वप्रथम येण्याचा मान मात्र साता-याच्या गौरव कुलकर्णीने पटकावला आहे. कोल्हापूरचा अपवाद वगळता अन्य सर्व विभागांमध्ये मुलीच पहिल्या आल्या. मुंबईत प्रतीक रामदासी आणि मधुरा नाईक यांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक मिळवला.

राज्यात यंदाच्या वर्षी दहावीच्या परीक्षेत ७८.९१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. नवीन अभ्यासक्रमानुसार प्रथमच झालेच्या दहावी परिक्षेसाठी यावर्षी राज्यभरातून १५ लाख ९८ हजार २१३ विद्यार्थी बसले होते. गेल्यावर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या जवळपास ८ टक्क्यांनी वाढली आहे.

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा विभागीय रिझल्ट पुढीलप्रमाणे -

मुंबई - ८६.२५ टक्के

पुणे - ८७.८९ टक्के

नाशिक - ८८.७ टक्के

नागपूर - ७८.८४ टक्के

औरंगाबाद - ८९.४५ टक्के

कोल्हापूर - ८५.९७ टक्के
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links