मुंबई हल्ल्यातील एकमेव जिवंत पकडण्यात आलेला अतिरेकी अजमल अमीर कसाब यांची न्यायालयात वकिली करणारे अधिवक्‍ते अब्बास काझमी यांना राज्यशासन दरमहा ५० सहस्र रुपये मानधन देणार आहे.

(अतिरेक्याची वकिली करण्यासाठी भारतीय जनतेच्या कररूपी पैशातून ५० सहस्र रुपये देऊन भयोत्पादकी हल्ल्यात मृत झालेले पोलीस, जवान व नागरिक यांच्या कुटुंबियांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार काँग्रेस शासन करत आहे. लोकहो, काँग्रेस शासनाला याबाबत जाब विचारा ! - संपादक) आर्थर रोड कारागृहातील विशेष न्यायालयात दर आठवड्यातील सोमवार ते शुक्रवार या पाच दिवसांत या खटल्याचे कामकाज सध्या चालत आहे. काझमी यांना यासाठी प्रतीदिन २ सहस्र ५०० रुपये मानधन देण्यात येणार आहे. खटला चालवण्यासाठी एखाद्या आरोपीला वकील देता आला नाही, तर भारतीय कायद्याप्रमाणे राज्यशासनाच्या विधी खात्याकडून या आरोपीला वकील पुरवला जातो. अशा वकिलाला साधरणत: ९०० रुपये इतके मानधन दिले जाते. कसाबच्या खटल्याची संवेदनशीलता पहाता विशेष न्यायालयाचे न्या. एम्.एल्. ताहिलीयानी यांनी काझमी यांची कसाबचे वकील म्हणून नियुक्‍ती करतांना त्यांना पुरेसे मानधन देण्याचे आदेश शासनाला दिले होते. त्यामुळे विधी व न्याय खात्याने काझमी यांना प्रतीदिन २ सहस्र ५०० रुपये मानधन देण्याचे निश्चित केले आहे. या माहितीला काझमी यांनीही दुजोरा दिला आहे.



निगडीत वृत्त : देशाचे वाटोळे करणार्‍या सर्वच राजकीय पक्षांना नष्ट करा !

सच्चर आयोगाच्या अहवालाची त्वरित कार्यवाही करा - जनता दल (संयुक्‍त) : 2009-06-03
मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याची पाककडून निर्दोष मुक्‍तता : 2009-06-03
प्रधान समितीचा अहवाल फुटला नसल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा : 2009-06-03
रडतराऊत गृहमंत्र्यांची हतबलता ! : 2009-06-03
काँग्रेसने राज्यात निवडणुका स्वबळावर लढवण्याबाबत लाखो कार्यकर्त्यांच्या भावना - विलासराव देशमुख : 2009-06-02
पूर्वीचीच अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवावी - मुंबई काँग्रेस कमिटीची मागणी : 2009-06-02
मीरा कुमार लोकसभा अध्यक्षपदी नियुक्‍त : 2009-06-02
२६/११ च्या हल्ल्याच्या अहवालावरून विधानसभेत प्रचंड गोंधळ ! : 2009-06-02
मीरा कुमार यांच्याकडे लोकसभेचे अध्यक्षपद येण्याची शक्यता : 2009-06-01
`उडत्या शवपेट्यां'चा वापर अद्यापही सुरूच; सुखोई विमाने आहेत कुठे ? : 2009-06-01
6 Comments   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links