नियोजित वेळेनुसार श्रीहरिकोटातील सतीश धवन स्पेस सेंटरचे दुसरे लाँचपॅडवरून आज सकाळी ६.२२ मिनिटांनी चांद्रयान-१ आकाशाकडे झेपावले. चांद्रयान-१च्या यशस्वी उड्डाणामुळे मोहिमेत समाविष्ट असलेल्या भारतीय संशोधकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. भारतासाठी गौरवशाली इतिहास रचलेल्या चांद्रयानाबरोबर तिरंगा पाठवण्यात आला आहे.
भारताने आजवर अनेक उपग्रह अवकाशात सोडले असले तरी चंद्राकडे झेपावणारे हे पहिलेच यान असल्याने त्याच्या उड्डाणाकडे सर्वांचे लक्ष खिळले आहे. हे उड्डाण यशस्वी व्हावे , म्हणून श्रीहरीकोटात इंजिनीअर , स्पेस सायंटिस्टची लगबग सुरू होती.
1 Comment Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments
सर्व शास्त्रज्ञांचे हार्दिक अभिनंदन.