परवा निरुपम ची टी वी वर पत्रकार परिषद् बघितली । काय काय बरळतो हा माणुस बघून विश्वासच बसत नाही, म्हणे राज साहेबानी राष्ट्र द्रोह केला आहे, त्यानीँ वेगळ्या महाराष्ट्राची मागणी केली आहे । ह्यानी आधी भाषण बघीतलं तरी का, राज साहेब म्हणाले की हे असच जर चालू राहिला तर कुठल्या मराठी तरुनामधे जर वेगळ्या महाराष्ट्राचे विचार आले तर त्याला हे सर्व नेते जबाबदार असतील । कालपासून ह्या वाक्याचा एवढा विपर्यास केला आहे की सांगता सोय नाही । कालच NDTV वर कार्यक्रम बघत होतो आणि त्यानीँ पण आज तक प्रमाणे ह्या वाकया भोवती आपला कार्यक्रम सदर केला । कोणी संपूर्ण भाषण ऐकलं नाही , कोणाला कशाचा पत्ता नाही आपली उचलली जीभ लवली टाळ्याला । त्यांच्या भाषणात राज साहेबानी सांगितलं की सर्व शहर ही भारतातच आहेत आणि भारताचिच आहेत पण भाषावार प्रान्त रचने नुसार मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि मुंबई वर महाराष्ट्राचा अधिकार आहे मग त्यात काय चुकलं? ह्या सर्व वहिन्यानीँ आणि भैया निरुपम नि डोम्बीवलीतील अति विराट सभा बघितली असती तर ह्यांची बोबडीच वळाली असती । आम्हा कर्यकर्त्याना देखिल आत शिरायला भेटलं नाही आणि आम्ही भाषण गेट वर उभ राहून ऐकलं । ह्या निरुपम नि अजुन अकलेचे तारे तोडले, म्हणे भैयाना टँक्सी चालवन्यासाठी कायद्यात बदल करा । आम्ही काय हातात बांगड्या भरल्या आहेत काय? बदल करून तर दाखवा , हा उभा महाराष्ट्र त्याला विरोध केल्या शिवाय राहणार नाही ..... तेव्हा निरुपम तुमची बकबक बंद करा ...............
1 Comment   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links