काल रात्रीच्या बातम्या बघितल्या आणि नंतर आज सकाळचे वर्त्तमान पत्र वाचली आणि आमचं तर डोकच फ़िरलं। आम्हाला राहुल गांधीन बद्दल आणि त्यांच्या प्रगल्भते बद्दल आशा होती पण त्यानीं ती पर धुळीला मिळवली । त्यांच्या म्हणन्या प्रमाने मराठी माणुस मुंबई च रक्षण करू शकत नाही आणि आम्हाला यु पी , बिहारच्या लोकांची मदत घ्यावी लगते । हा तर २६/११ च्या लढ्यात शहीद झालेल्या लोकांचा अपमान आहे , ह्या लढ्यात असख्यं स्थानिक लोकानी प्रशासनास मदत केली त्यांचा अपमान आहे आणि हा उभय महाराष्ट्राचा अपमान आहे। त्यांनी जर इतिहास तपासून पहिला तर त्यांना कळेल की ह्या महाराष्ट्राने आणि सह्याद्रिने दिल्लीचे तख्त राखले आहे आणि परकीय आक्रमनाला आपल्या पराक्रमाने परतवून लावले आहे । जर NSG कमांडो चा बेसच दिल्लीला आहे आणि राज्य स्तरावर जर अशी यंत्रणा नाही तर महाराष्ट्रातील पोलिसानां किवां राज्य शासनाला दिल्लीची मदत घ्यावीच लागणार त्यात प्रांतवाद आला कुठे? हे तर केंद्र शासनाचा अपयश आहे की त्यानी राज्य स्तरावर अशी यंत्रणा उभी नाही केली आणि केंद्रात , राज्यात तर ह्यांचच सरकार आहे । राहुल गांधीनी उभ्या महाराष्ट्राचा अपमान केला आहे हे निच्छित आणि हे आम्ही विसरणार नाही ।
5 Comments   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links