आगामी ८२ वे आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सान फ्रान्सिस्कोत घेण्याच्या महामंडळाच्या निर्णयाला साहित्यिक, आयोजनासाठी उत्सुक असलेल्या इतर संलग्न संस्थांकडून विरोध होत आहे. सान फ्रान्सिस्को येथे होणा-या संमेलनाला पर्यायी संमेलन आयोजित करता येईल का, अशीही चाचपणी सुरू झाली आहे. हा निर्णय मनमानी असल्याची टीका रत्नागिरीतील नगर वाचनालयाने केली आहे. ' नगर वाचनालय ' संमेलन आयोजनाच्या स्पर्धेत होते. रविवारी याबाबत झालेल्या निर्णयावर नगर वाचनालयाचे अध्यक्ष दीपक पटवर्धन म्हणाले : भांडवलशाही वृत्तीच्या लोकांनी संमेलनस्थळ ' हायजॅक ' केले , असे म्हणावे लागेल! ' साता समुदापलीकडे नेल्या ' बद्दल उदात्तीकरण आता सुरू होईल ; पण याची गरज होती ? काही सदस्यांची अमेरिकावारी , एवढेच यातून साध्य होईल!
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links