टिंग्या हा चित्रपट, विर्दभात आणि महाराष्ट्रात इतरत्र शेतकर्‍यांच्या आत्महत्येवर आधारीत आहे, अश्या आगाऊ सुचनेवर मी टिंग्या पाहयला गेलो. पण प्रत्यक्षात हाडावल्यांची हि निर्मीति, मानवी भावणांनी अंत्यत काळ्जीपुर्वक विणलेली आणि आयुष्याच्या ओभड धोबड रस्त्यात आशावाद टिकवुन ठेवनारी एक सुदंर गोष्ट आहे. आणि झालेल्या अपेक्षाभंगा विषयी मला फार आनंद आहे.

तिन तासाचा हा चित्रपट टिंग्या, चितंग्या (त्याचा आवडता बैल), रशीदा (त्याचि मैत्रीण), त्याचा भाउ आणी त्याचे शेतकरी आई-बाबा, ह्यांना घेउन नेमकीच घर असलेल्या एका गावात सजतो. टिंग्या त्याच्या ह्या छोट्याच्या विश्वात बेफिकर आणी त्याच्या वयाला शोभेल अश्या धुंदीत अगदी मजेत वावरत असतो.

टिंग्याच शेतकरी कुटुंब जरी गरीब असल तरी ते दु:खी नसत, थोडस पावसावर आणी थोड शेजार्‍यांवर अवलंबुन जरी असल तरी लाचार मात्र नक्कीच नसत. टिंग्याच्या ह्या विश्वात अश्याच एका दिवशी चितंग्याचा खड्यात पडुन पाय दुखावतो. पाऊस अगदी तोंडावर असताना चितंग्याचा फट्का चितंग्यापेक्षा, टिंग्याच्या बाबांना जास्त बसतो. बरेच दिवस वाट पाहुन शेवटि, शेतिसाठी निकामी झालेला बैल खाटकाला विकून जोडीसाठि दुसरा बैल घेण्याशीवाय त्याना दुसरा पर्याय उरत नाही. चितंग्या विकला जाउ नये म्हनुण टिंग्याची धडपड, पाय दुखावलेला चितंग्या व आजारी पडलेली रशीदाचि आजी ह्यावर टिंग्याने विचारलेले तुलनात्म्क प्रश्न मनात बराच वेळ गुरफटुन राहतात. चित्रपटाचा बराचसा भाग हा टिंग्याच्या विश्वातिन प्रत्येकाने चितंग्याला वाचवण्यासाठी केलेल्या संर्घषावर केंद्रीत आहे.

हाडावलेंनी टिपलेली ग्रामीन भागातिल भावुक संवेदनशीलता, आणि ति तंतोतंत जिवंत करणारा टिंग्या मालगुडी डेज मधल्या स्वामीची आठवण देवुन जातो. टिंग्याचा हा पहीला चित्रपट ह्यावर विश्वास बसने कठीन आहे, आणि त्याच श्रेय पुर्णपने मंगेश हाडावलेंना जाईल. चित्रपटातिल ग्रामीन संवाद, टींग्याला त्याच्या आईने मारलेली टींग्याव अशी हाक, मराठि शब्दांचे पोटभाषीक उच्चार, एका हाताच्या बोटावर मोजता ऐतिल इतकिच घर मुंबईकरांना तीन तासासाठी का होईना पण मुबंईच्या दगदगीबाहेर घेउन जातात.

चित्रपटातले काहि क्षण फार काळ लक्षात राहतात, आणि आठवले की एक वेगळ हास्य घेऊन येतात. त्यातले काही क्षण म्हणजे, टींग्याच्या आईने टींग्याला दिलेली "संध्याकाळी लक्ष्मी यायच्या वेळेला, उबंठ्यात बसू नये" अशी समज आणि त्यावर "लक्ष्मी येण म्हणजे नक्की काय" असा टींग्याने विचारलेला अनोत्तरीत प्रश्न. रशीदा अम्मीकडुन मार खाल्यानंतर आजीन बक्षिसात दिलेल्या रुपया मोजण्याचा क्षण. आणि एकुण २२ रुपये मोजुन झाल्यावर तिला अम्मीने २२ वेळा मारल असा तिने काठलेला निष्कर्श. असे बरेच छोटे मोठे प्रसंग, चित्रपटाला अगदि स्पेशल बनवतात.

सगळ्यात ऊल्लेखनिय बाब अशी कि, सगळीकडेच दारिद्र्य आणि नैराश्य असताना देखिल छोट्या क्षुल्लक गोष्टितुन आनंद मिळ्वणारा टिंग्या आणि त्याचि मैत्रीण रशीदा चित्रपटात एक आशावाद टिकवुन ठेवतात. टिंग्याबरोबर हा आशावाद मराठि चित्रपटांनाहि लाभेल असा निष्कर्श काठण्यास हरकत नाही.

शेवटि टींग्याच्या भाषेत सांगायच झाल म्हण्जे "म्हपल्याला पिक्चर भारी आवडला :)"

Company: A Small Town Boy Production
Producer: Anita Rai, Anand Rai, Ravi Rai
Story, Screenplay and Dialogues & Direction: Mangesh Hadawale
Lyrics: Prakash Holkar
Director of photography: Dharam Gulati
Cast: Sharad Goekar, Tarnnum Pathan, Ajit Gawande, Inesh chauhan, Sunil Deo, Madhavi Juvekar, Chitra Nawathe, Vitthal Umap, Kamlesh Sawant, Mansi Lonkar
14 Comments   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links