मुंबईतील एक लाखांहून अधिक रिक्षावाल्यांनी व त्यांच्या नेत्यांनी केलेल्या दादागिरीपुढे नमून राज्य सरकारने रिक्षाचे भाडे दोन रुपयांनी वाढवून दिले.
त्यामुळे गुरुवार सकाळपासून उपनगरवासी व ठाणेकरांना किमान भाड्यासाठी ११ रुपये मोजावे लागणार आहेत. एक रुपया सुट्टे देण्याचा निर्माण होणारा प्रश्न व महागाईचा निकष लक्षात घेऊन १० रुपये भाडे योग्य असल्याचे ग्राहक संघटनांनी ठामपणे मांडले.
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments