नाटकांना विरोध होणार, याची तेंडुलकरांना कल्पना होती, पण तरीही स्वत:ला जे पटले ते मांडण्यास ते कधी घाबरले नाहीत. त्यांना उमजलेले सत्य त्यांनी निभिर्डपणे मांडले. 'सखाराम'नंतर तेंडुलकर, कमलाकर आणि लालन सारंग या तिघांनीही जे सोसलं त्याला तोड नाही.

त्यांच्या वागण्यात प्रामाणिकपणा होता. जे काही पटलं, ते त्यांनी भीड न ठेवता केलं. माणूस म्हणूनही ते अतिशय प्रेमळ होते. पुण्यात आल्यावर माझी अगत्याने चौकशी करायचे. त्यांच्या दोन्ही कादंबऱ्या त्यांनी मला भेट दिल्या. आवडल्या तर पत्र पाठव, नाहीतर नको, असं सांगितलं होतं. मी पत्र नाही पाठवलं. त्यांनीही पुन्हा त्याबद्दल विचारलं नाही आणि त्यांचं माझ्यावरचं प्रेमही उणावलं नाही...
1 Comment   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links