यंदाच्या विधानसभा निवडणुकीचे ठळक वैशिष्ट्य कोणते, या प्रश्नाचे उत्तर राज ठाकरे यांच्या मनसेने रोवलेला 'तीन लोकी झेंडा' हेच असल्याचे पदार्पणातच १३ आमदार विधानसभेत पाठवून, 'नाशिक बाजा'च्या गजरात मनसेने जाहीर केले आहे!

लोकसभा निवडणुकीत मनसेने मुंबई-ठाणे पट्ट्यात लाख लाख मते घेत युतीला मोठा फटका दिला, तेव्हा 'मनसेची मजल एवढीच!' अशी हेटाळणी केली गेली. पण आता मनसेने मुंबईत शिवसेनेपेक्षा दोन जास्त, म्हणजे सहा जागा तर जिंकल्याच; शिवाय नाशिकच्या तिन्ही व कल्याणच्या तीनपैकी दोन जागा जिंकत मुंबईसह नाशिक-कल्याण या शहरांवरही आपला झेंडा रोवला!
4 Comments   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links