वांद्रे-वरळी सी लिंकच्या दुसऱ्या लेनच्या उद्घाटन सोहळ्यावरून सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगळेच 'सेतू रामायण' घडल्याचे बुधवारी पाहायला मिळाले. 'फायली क्लीअर' होण्यावरून उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यात आतापर्यंत मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील बंद खोलीत होणारा वाद सी लिंकवर जाहीरपणे रंगला. त्यात भर म्हणून, या कार्यक्रमाला मुलायम सिंह यांच्या समाजवादी कंपूत राहून काँग्रेसविरोधी राजकारण करणारे आणि आता नरेंद मोदींच्या गुजरातचे ब्रँड अॅम्बेसिडर बनणारे अमिताभ बच्चन यांना का बोलावले त्यावरून काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटला. हा वाद रात्री थेट काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या दरबारी गेला असून त्यांनी त्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे विचारणाही केली.
1 Comment   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links