एखादे दिवशी अगदी उठण्यापासूनच सगळ्या गोष्टी चुकतच जातात. कारण तसे काही खास घडत असते असे मुळीच नाही. न चुकता गजर वाजतो. डोळे तटकन उघडतात. आजूबाजूला निरव शांतता असते. अजून पाचच मिनिटे झोपेची अनिवार गुंगी अनुभवावी असा मोह होतो. सहा-सात तास गाढ झोप झाली तरी या पाच मिनिटांची सर कशालाच नाही. आजही असाच मोह झाला अन आवरलाच नाही. पाच मिनिटांची ही उबदार धुंदी तब्बल अर्धा तास अंगात भिनून राहिली.
Discuss Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments