राजधानी दिल्ली इतिहासाच्या अनेक घटनांची साक्षीदार असली तरी फिरोजशहा कोटला स्टेडियम दोन घटनांसाठी क्रिकेटप्रेमींच्या कायम लक्षात राहील... एक : ४ फेब्रुवारी १९९९ रोजी अनिल कुंबळेने पारंपारिक प्रतिस्पधीर् पाकिस्तानचे एकाच डावात घेतलेले दहा बळी आणि दोन : २ नोव्हेंबर २००८ रोजी ६१९ कसोटी बळींचा माइलस्टोन गाठून अनिल कुंबळेची निवृत्तीची घोषणा. दिल्ली कसोटीत राम उरला नसताना ड्रेसिंग रूममधून दुपारी अचानक कुंबळे रिटायर्ड, अशी बातमी आली आणि सारं स्टेडियम सुन्न झालं... सामना ड्रॉ झाल्यानंतर टीम इंंडियाने आपल्या कॅप्टनला खांद्यावर बसून स्टेडियमभर फिरवले. क्रिकेटप्रेमींना अभिवादन करणारा जम्बो दिसला आणि गेली अठरा वर्ष घोंघावणारे एक वादळ शांत होत असल्याची साक्ष पटली...
1 Comment   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links